पुणे : राज्यसभेची निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होत आहे. जशी जशी तारिख जवळ येत आहे. तशी राजकीय पक्षांमध्ये तयारी सरू झाली आहे. अशातच महाविकास आघाडीतील दोन मत ही कमी होण्याची शक्यता आहे. या सत्तास्थापनेच्या वेळी सपाने आघाडीला पाठिंबा दिला होता. पंरतु आघाडीने अल्पसंख्यांकांना काहीच दिलं नसल्याचं कारण देत सपा या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
“राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
सपाचे आमदार अबु आझमी यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीकडून अल्पसंख्यांकांना काहीच दिलं नाही. महाविकास आघीडीचा चेहरा हा नव हिंदुत्वाचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील पाठवलं आहे. याआधी देखील अबु आझमी यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते.
“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
राज्यसभेच्या या निवडणुकीत अपक्ष आमदारांची भूमिका मोलाची ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील सगळ्या नेत्यांना निवडणुक होई पर्यंत एकाच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळत आहे. त्यामुळे समाज वादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि अब्दुल रशिद ताहीर मोमिन हे तटस्थ राहण्याची शक्यता आहे.
संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
दरम्यान, राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत चुरस बघायला मिळणार आहे. भाजपकडून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार यांच्या टक्कर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे मात्र नक्की झालं आहे. यावर देखील राजकीय नेत्यांनी टिकाटिप्पणी केली आहे.
Read also:
- पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
- “मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
- ” राज्याचे मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतंय”; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार