मुंबई : मुंबई महापालिकेने विशेष ठराव करून केवळ भाजप शिवसेना आमदारांनाच ५०० कोटी रूपयांचा विकासनिधी दिला नाही तर ३१ नगरसेवकांना १६३ कोटी २९ लाख रूपये आकस्मिकता निधीतून देण्यात आले आहेत. या ३१ माजी नगरसेवकांपैकी ३० नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे पक्ष बदलताच पाच पाच कोटी अशी टिका आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा…“तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत”, भुजबळांनी ओबीसींना केलं मोठे आवाहन
मिंधे गटात जा आणि महापालिका लुटा. अशीच ऑफर मुंबई महानगरपालिकेने सध्या काढलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत वापरण्यात यावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राखीव ठेवलेला आकस्मिक निधी असतो. सामान्य मुंबईकरांसाठी अशाच प्रकारे राखीव ठेवलेला आकस्मिक निधी घटनाबाह्य सरकारने गद्दारी करणाऱ्यांवर वापरला आहे. ३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रूपये देण्यात आलेले आहेत. सामान्य मुंबईकरांसाठी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असलेला निधी गद्दारांवर खर्च करण्याची ही कुठली स्किम महापालिकेने काढली आहे का ? असा टोला देखील ठाकरे गटाने लगावला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाने केली १४ प्रवत्यांची नियुक्ती, मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर अमोल मिटकरी..
दरम्यान, महापालिकेने शिंदे गटात प्रवेश केलेल्या ३० माजी नगरसेवकांना आकस्मिकता निधीतून प्रत्येकी पाच कोटी रूपये वितरित केले . परंतु उर्वरित १९६ नगरसेवकांना मात्र एक रूपायाही दिला नाही. आकस्मिकता निधीचा वापर प्रामुख्याने पावसाळ्यात करण्यात येतो. एखाद्या रोगाची साथ, भुस्खलन, पुल कोसळणे यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत हा निधी वापरला जातो. आकस्मिकता निधीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था साधारणपणे आपल्या निव्वळ वार्षिक उत्पन्नाचा सुमारे ४ टक्के हिस्सा राखून ठेवतात.
READ ALSO :
हेही वाचा…गृहमंत्री फडणवीसांचा पुण्यात ‘नवा नागपुर पॅटर्न’, अजित पवारांना पुण्यात धक्का ?
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळचा मुख्य मारेकरी अखेर अटकेत, नाशिक रोडवर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी,”? दानवेंचा शेलारांचा खोचक सवाल
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप