रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून रायगड संवाद दौरा सुरू होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण पाच सभा होणार असून सकाळी १ वाजता पेण शहर प्रायव्हेट हायस्कुलजवळ उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर दुपारी तीन वाजता चौल तालुक्यात ठाकरेंची सभा होणार असून संध्याकाळी रोहा एमआयडीसी बायपास रोड उरूस मैदानावर दुसरी सभा होणार आहे. तर उद्या २ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता म्हसळा शहरातील दिघी रोड येथे सभा होणार असून त्याचदिवशी दुपारी तीन वाजत काळ भैरव सहान याठिकाणी सभा होणार आहे. त्यानंतर माणगावात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. यावरून आता भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे.
हेही वाचा…“पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित”, 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागणारे उबाठा गटाचे प्रमुख अस्तिवत्वाच्या जुन्या खूणा शोधण्यासाठी रायगड दौरा करीत असल्याची टिका त्यांनी केलीय. मलपत्रात बातमी आली आहे की उद्धव ठाकरे यांचे रायगडमध्ये स्वागत मुंबईतील मराठी मुस्लिम सेवा संघाचे शिलेदार करणार आहेत. उत्तम अतिउत्तम असं म्हणत शेलारांनी ठाकरेंना डिवचलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल १३० पीआयच्या बदल्या, आम आदमा पार्टीने उपस्थित केली शंका”
त्यातच मुंबईतील मालवणी, बेहरामपाडा, महमद अली रोड आणि मुंब्रा येथील तुमच्या सगळ्या शिलेदारांना सोबतच घेऊन या. जमलेच तर दाऊदच्या मालमत्तांचा नुकताच लिलाव झाला आहे. रत्नागिरीत जाऊन त्याची पण आस्थने पाहणी करून या. रायगडचा झंझावती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का ? या दौऱ्याला तमाम कोकणवासीयांनी शुभेच्छा द्याव्या का ? असा खोचक सवाल शेलारांना ठाकरेंना केलाय.
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अंबादास दानवेंनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांनी मुस्लिम कार्यक्रमात हजेरी लावलेले शेलारांचे फोटो तसेच उद्धव ठाकरेंसमोर झुकणारा फोटो ट्विट केला आहे. त्याखाली दानवे यांनी काय ‘जनाब’ शेलार! आपले स्थान विसरलात वाटतं. आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी, जे आज सकाळीच आमच्या नावाचं भजन गायला लागतंय? असा खोचक टोला लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
हेही वाचा…“तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत”, भुजबळांनी ओबीसींना केलं मोठे आवाहन
हेही वाचा…अजित पवार गटाने केली १४ प्रवत्यांची नियुक्ती, मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर अमोल मिटकरी..
हेही वाचा“महाविकास आघाडीत अद्यापही वंचितचा समावेश झाला नाही,” प्रकाश आंबेडकर म्हणाले…