मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १४ प्रवक्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक तरूण नेत्यांना संधी देण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्ते पद काढून घेण्यात आले असून राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपालीताई ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के -पाटील, सायली दळवी आदींचा समावेश आहे.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा पुणे दौरा, नरेंद्र मोदींना यंदाचा ‘शिव पुरस्कार’ जाहीर
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश शेषराव वेताळ आणि नाथशक्ती संघटना नाथजोगी समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेश किसन धायडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दोघांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, उद्योग सेलचे राज्यप्रमुख सुभाष मालपाणी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा“महाविकास आघाडीत अद्यापही वंचितचा समावेश झाला नाही,” प्रकाश आंबेडकर म्हणाले…
हेही वाचा…“पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित”, 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
हेही वाचा…“महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल १३० पीआयच्या बदल्या, आम आदमा पार्टीने उपस्थित केली शंका”
हेही वाचा…राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली की नाही ? कॉंग्रेसकडून या घटनेचा मोठा खुलासा
हेही वाचा…“विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी मुंबईकरांवर सूड कशाला उगवताहेत ?”