मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यातच राज्यात भाजपला हरवण्यासाठी वंचितने महाविकास आघाडीसोबत यावे, असे पत्रक महाविकास आघाडीतील नेत्यांनी काढले आहेत. मात्र त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही असून ती मी त्यांच्यी व्यक्तीगत सही मानतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अद्यापही महाविकास आघाडीत सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा पुणे दौरा, नरेंद्र मोदींना यंदाचा ‘शिव पुरस्कार’ जाहीर
कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी त्या पत्राला किमंत आहे. अद्याप महाविकास आघाडीत कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. हवेत पतंग उडवल्यासारखी यांची चर्चा होते. पत्रावर नाना पटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती कॉंग्रेस पक्षाची नाही. कॉंग्रेस प्रभारींशी माझ्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिलेत. मग नाना पटोलेंनी सही कुणाच्या सांगण्यावरून केली? आरएसएस-भाजपाविरोधात जे आहेत. त्यांची एक मोट बांधावी असा आमचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसपक्षाने त्यांची भूमिका मांडावी. असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या,” राहुल कनालचं संजय राऊतांना आव्हान
काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही काही मुद्दे मांडले आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसेच दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलने केले आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली. त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित”, 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
हेही वाचा…“महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल १३० पीआयच्या बदल्या, आम आदमा पार्टीने उपस्थित केली शंका”
हेही वाचा…राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली की नाही ? कॉंग्रेसकडून या घटनेचा मोठा खुलासा
हेही वाचा…“विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी मुंबईकरांवर सूड कशाला उगवताहेत ?”
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी