नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारमध्ये आहे. बुधवारी कटिहारमध्ये त्यांनी पदयात्रा केली आणि लोकांशी संवाद साधला. या यात्रेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये राहुल गांधी यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा किशनगंजमार्गे बिहारमध्ये जात असतांना राहूल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेचा आता कॉंग्रेसकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
हेही वाचा…जळगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार..! शरद पवारांचा ‘हा’ खंदा शिलेदार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात
राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा बातम्यांसंदर्भात कॉंग्रेसकडून खुलासा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. या गर्दीत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी अचानक एक महिला त्यांच्या गाडीसमोर आल्याने गाडीला अचानक ब्रेक लागला. त्यानंतर सुरक्षा वर्तुळात वापरलेल्या दोरीमुळे गाडीची काच फुटली. लोकनेते राहुल गांधी जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायासाठी लढा देत आहेत. जनता त्यांच्यासोबत असून त्यांना सुरक्षित ठेवत आहे. असं कॉंग्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात पहिली याचिका दाखल, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, पण..
दरम्यान, बिहार राज्यात अलिकडे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यावरून देखील राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. बिहारच्या भूमीवर अन्यायाविरोधात सुरू असलेल्या न्यायाच्या या महायात्रेला जनतेचं भरपूर प्रेम आणि समर्थन मिळतंय. असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा बातम्यांसंदर्भात खुलासा !
पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुलजींना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. या गर्दीत राहुलजींना भेटण्यासाठी अचानक एक महिला त्यांच्या गाडीसमोर आल्याने गाडीला अचानक ब्रेक लागला.त्यानंतर सुरक्षा वर्तुळात वापरलेल्या…— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 31, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी मुंबईकरांवर सूड कशाला उगवताहेत ?”
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा पुणे दौरा, नरेंद्र मोदींना यंदाचा ‘शिव पुरस्कार’ जाहीर
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या,” राहुल कनालचं संजय राऊतांना आव्हान
हेही वाचा…सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी, मुंबई महापालिकेचा अजब कारभावर, आव्हाडांचा सरकारवर संताप