जळगाव : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. ३५ वर्षापासून कॉंग्रेससोबत असलेले माजी खासदार उल्हास पाटलांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांची कन्या केतकी पाटील यांनी देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे आता भाजपने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील मोठे खिंडार पाडले आहे.
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचे संजय गरूड गेल्या ३५ वर्षापासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणुक लढत आले आहेत. त्यांनी महाजन यांच्याविरोधात तब्बल ४ वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना एकदाही यश मिळाले नाही. गेल्या काही दिवसापासून पक्षातूनच त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला सामोरे जावे लागत होते. त्याशिवाय विरोधी बाकांवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने गरूड त्रस्त होते. त्यांनंतर संजय गरूड यांनी गिरीश महाजन यांची भेट घेऊन भाजपात येण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील राजकारणात गिरीश महाजन यांच्या भूमिका गेल्या काही दिवसापासून चांगलीच उदयास आली आहे. सुरूवातीला त्यांनी कॉंग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील आणि केतकी पाटील यांचा भाजपात प्रवेश करून घेतला. त्यानंतर आता कट्टर विरोधक संजय गरूड यांना आपल्याकडे आणण्यात गिरीश महाजन यांना यश आले आहे. याआधीही गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना निवडणुकीच्या आधी भाजपात आणण्याची महत्वाची भूमिका पार पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गिरीश महाजन राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांच्यावर भारी पडणार का ? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अनिल बाबर यांची ‘पाणीदार’ आमदार म्हणून अशी ओळख का ? वाचा सविस्तर
हेही वाचा..मोठी बातमी..! मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात पहिली याचिका दाखल, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, पण..
हेही वाचा….महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव वंचिने स्विकारला, लोकसभा निवडणूक महायुतीला जड जाणार ?
हेही वाचा…पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब