मुंबई : महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे अदृश्य शक्तीने ठरवलेले आहे. त्यामुळे या शक्तीकडून महाराष्ट्राची तोडफोड व मराठी माणसाचा अपमान करण्याचे पाप होत आहे. दुर्दैवाने सत्तेमधल्या लोकांना ते मान्य आहे. मला ते मान्य नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आमची लढाई त्यांच्यासोबत कालही होती आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
हेही वाचा…पुण्यात मोठा राडा ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
विरोधी पक्ष म्हटले की आईस आणि त्यांच्याकडे गेले तर वॉशिंग मशीनमधून माणूस निघून येतो. त्यामुळे दुर्दैव आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याऐवजी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आज कुठे असेल तर तो भाजप पक्षात आहे. भाजप असा नव्हता हा नवीन जो भाजप आहे तो पुर्णपणे भ्रष्ट आहे. असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. आरक्षण, महागाई व बेरोजगारी सारखे गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रासह देशासमोर आहेत. व नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. २०० आमदार व ३०० खासदार असूनही ते प्रश्न सोडवले जात नाही. हे सरकारचे पुर्णपणे अपयश आहे. अशी टिका देखील सुळे यांनी केली.
हेही वाचा…“भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढावं”, प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, छगन भुजबळ संतापले
दरम्यान, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. त्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. या निमित्ताने अमित शाह यांचे एक विधान आठवते की, आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमार यांच्याबरोबर आघाडी करणार नाही. सत्तेसाठी भ्रष्टाचार व नैतिकता विसरून काहीही करा. आईस पक्ष फोडा, घरे फोडा पण सत्तेत रहा. आता हेच भाजप करतांना दिसत आहे. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा.“प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार”, उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा…“कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अनेक ठिकाणी डपॉझिट जप्त होईल”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
हेही वाचा…“जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही, गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचाय”
हेही वाचा…“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र