पुणे : राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडल्यानंतर दोन्ही गटात आता टिका टिप्पणी वाढतच चालली आहे. यातच अजित पवार सध्या सोलापूर आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी यावेळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते टी. राजा देखील कोल्हापुरात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून रोहित पवारांनी अजित पवारांना खोचक टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा…“जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ?” भाजपच्या माजी खासदाराचा तिखट सवाल
रोहित पवारांनी अजितदादांना लिहिलेले पत्र
मा. अजितदादा,
आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही.
हेही वाचा…महायुतीत एकच खळबळ ! “निवडणुका लागताच महायुतीत भूंकप होणार,” राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला सुचक इशारा
याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे.
दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा!
मा. अजितदादा,
आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग… pic.twitter.com/6kZth8Piv3— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 30, 2024
READ ALSO :
हेही वाचापुण्यात मोठा राडा ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…“भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढावं”, प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, छगन भुजबळ संतापले
हेही वाचा…” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”
हेही वाचापंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपकडून खासदार होणार ? भाजपची रणनिती ठरली, कुणाचा पत्ता कट होणार ?