मुंबई : मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राला मंत्री छगन भुजबळांनी प्रखरपणे विरोध केला आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर छगन भुजबळांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात सध्या मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. यावरूनच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला. त्यावर भुजबळांनी देखील आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…आता पुन्हा राज्यात नॉटरिचेबल का होतो? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…
छगन भुजबळ यांनी आपली ओबीसींबाबत असलेली भूमिका सार्वजनिक न मांडता त्यांनी कॅबिनेट मध्ये मांडावी. कॅबिनेटमध्ये जर त्यांचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसींसाठी राजीनामा द्यावा. कारण त्यांनी जी भूमिका घेतली आहे. त्याला आधार आहे. नाही तर एका बाजूला सत्ता भोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं. या दोन्ही गोष्टी एकाच हतात कशा राहतील. असा सवाल देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी महापौर अन् पाटलांचा कट्टर समर्थक अजित पवार गटाच्या गळाला
प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्रिमंडळात राहावं की नाही, याबाबत माझ्या पक्षाने ठरवावं, किंवा मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, ते याबद्दल का बोलताहेत.? मला मंत्रिमंडळाची चिंता नाही. मला ओबीसींच्या दु:खापुढे माझ्या पदाची चिंता नाही. असं म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”
हेही वाचापंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपकडून खासदार होणार ? भाजपची रणनिती ठरली, कुणाचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा…“जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ?” भाजपच्या माजी खासदाराचा तिखट सवाल
हेही वाचा…महायुतीत एकच खळबळ ! “निवडणुका लागताच महायुतीत भूंकप होणार,” राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला सुचक इशारा