नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपुर्वी आता संपुर्ण देशात राज्यसभा निवडणुकीचा गुलाल उधळणार आहे. देशातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार असून महाराष्ट्रातील पाच जागांसाठी निवडणुक होत आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणुक आयोगाने घोषणा केली आहे. यातच आता भाजपच्या प्रमुख नेत्यांना राज्यसभेची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले,” अशी चर्चा, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
महाराष्ट्रातील भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन यांचा कार्यकाळ संपत आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मागच्या वेळी राज्यसभेवर संधी मिळाली होती. त्यानंतर अल्पावधितच त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आलं. नारायण राणे महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते असून त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर प्रकाश जावडेकर यांना २००८, २०१४ आणि १०१८ मध्ये राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये त्यांना महत्वाची खाती देखील देण्यात आली होती. यातच आता त्यांना चौथ्यांदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले
तर दुसऱ्या बाजूला मुळचे केरळचे असलेले व्ही. मुरलीधरन यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची संधी देण्यात आली असून त्यांच्याकडे सध्या केंद्रात परराष्ट्र व संसदीय कार्य राज्यमंत्री पदाचा कारभार आहे. परंतु यावेळी त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांच्या जागी आता भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची भावना जनमाणसांत निर्माण झाली आहे. तसेच पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या देखील अलिकडे व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्यासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत आहे.
महायुतीत अजित पवार गट देखील सहभागी झाल्याने बीड विधानसभेत धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी मागच्या वेळी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊन परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांना सोडण्याची शक्यता आहे. तसेच जातीचा फॅक्टर विचारात घेऊन भाजपकडून विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ?” भाजपच्या माजी खासदाराचा तिखट सवाल
हेही वाचा…महायुतीत एकच खळबळ ! “निवडणुका लागताच महायुतीत भूंकप होणार,” राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला सुचक इशारा
हेही वाचा…आता पुन्हा राज्यात नॉटरिचेबल का होतो? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…
हेही वाचा…सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी महापौर अन् पाटलांचा कट्टर समर्थक अजित पवार गटाच्या गळाला
हेही वाचा… मोठी बातमी….! राज्यसभेसाठी निवडणुक जाहीर, महाराष्ट्रातील पाच जागांसाठी कोण असणार उमेदवार ?