मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन काढून सरकारला वेठीस धरले. त्यानंतर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीतून वाशीत दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: वाशीत येऊन मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. या अध्यादेशाला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला. यातच ता सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. यावरून मराठे जिंकले परंतू तहात हरले, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला असून त्यावर १५ फेब्रुवार पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. यावर तह झालेला नाही. मराठे जिंकून आले आहेत. कायदा झालेला आहे. सगेसोयरे संदर्भातही कायदा झालाय. त्यामुळे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही तरी अडचण नाही. कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सर्व मराठ्यांनी एकजूट राहा. एकत्र या. असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय.
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, सरकारने अधिसुचना काढली आहे. या अधिसुचनेवर सरकारने १५ दिवसांत लोकांचं म्हणणं मागितलं आहे. मराठा आरक्षणाची माहिती असलेले, या विषयातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, आरक्षणातील खाचखळगे माहित असलेल्या लोकांनी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे हा शब्द फायनरल झाला आहे. नोंद सापडलेल्यांमुळे नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगेसोयरे शब्दामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,