नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रता बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अजित पवार गटातील आमदारांचे निलंबन करण्यात यावे, यासाठी मागणीसाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली. या याचिकेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेण्यास विलंब करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर आज कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली.
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना या प्रकरणात निर्णय देण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मागच्या वर्षी दोन गट पडले. शरद पवार गट आणि अजित पवार गट. शरद पवार एक विरोधी पक्षात आहे. तर अजित पवार गट शिंद-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
दरम्यान, राज्यात मागील दीड वर्षात दोन मोठ्या राजकीय पक्षात फुट पडली. सुरूवातीला शिवसेना अन् त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षात फुट पडली. अलिकडेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलाय. तर राष्ट्रवादीचा निकाल अद्यापही राखून ठेवण्यात आलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट