मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नवीन जीआर काढला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात सरकारने नवीन जीआर काढला असून तो जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या हाती सोपविला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाला एकाअर्थी यश मिळालं आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे. आता याचवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली आहे. त्याचा सार्थ अभिमान असल्याचे अजित पवारांनी सांगितले. साताऱ्यातील औंध येथील एका कार्यक्रमादरम्यान, अजित पवारांनी हे सांगितले आहे. तसेच महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचेही अजित पवारांनी यावेळी नमुद केले.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ निघाताच गुणरत्ने सदावर्तेंचं मोठं विधान, कोर्टाची लढाई पुन्हा सुरू ?
जाहीरपणे छत्रपती शिवाजी महारांजांची शपथ घेतली. आणि ती शपथ पुर्ण करण्याचं काम पुर्ण करतो. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. मराठा समाजाला न्याय देत असताना संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
दरम्यान, संघर्ष कधीच वाया जात नसतो. संघर्ष करणाऱ्या योद्ध्याला प्रामाणिक लोकांची निःस्वार्थ सोबत असली की कितीही मोठे युद्ध जिंकता येतं हा इतिहास आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एक चिवट मावळा म्हणुन दिलेली यशस्वी झुंज इतिहास पाटलावर आज कायम कोरल्या गेली. एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला ऐतिहासिक यश! महायुती सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य! महायुती सरकारचे आभार व अभिनंदन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?