मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: वाशीत येऊन सरकारचा नवीन जीआर जरांगे पाटलांच्या हाती सोपविला. तसेच एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून जरांगे पाटलांचं उपोषण देखील सोडवलं आहे. यानंतर संपुर्ण राज्यात मराठा समाजाकडून एकच जल्लोष करण्यात येत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“तर गावाकडे राहिलेले सर्वच मराठे झाडून मुंबईत येतील”, जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला आंदोलावर चांगला मार्ग निघून त्याची सांगता झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली होती. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न सुटलेला आहे. याचा मला आनंद आहे. जरांगे पाटील यांचं देखील आभार मानून अभिनंदन करतो. ,सुरूवातीपासून आपण सांगत आलोय की आपल्याला यातून कायद्याच्या माध्यमातून मार्ग काढावा लागेल. सरसकट करता येणार, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांना देता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच संविधानाची तरतुद आहे. आमच्यावर कुठेतरीह अन्याय होईल का ? अशी ओबीसी बांधवांच्या मनात भीती होईल. त्यामुळे ओबीसींवर देखील कुठलाही अन्याय होऊ दिला नाही. अशी भूमिका देखील आम्ही घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य”, जरांगे पाटलांकडे सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटे खाली कोसळले
कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय झाला असला कुठलाही निर्णय झाला नाही. किंबवूना नोंदी असलेल्यांना अडचणी येत होत्या. त्या दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत. पुरावा नाहीत. अशा संदर्भातला हा निर्णय नसून ज्यांच्याकडे खऱ्या नोंदी आहेत. त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर भुजबळांचं देखील समाधान होईल. कारण पहिल्या दिवसापासून आमची ओबीसींवर अन्याय होऊ देऊ नये, असा निर्णय घेण्यात आलाय. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
क्यरेटिव्ह पिटीशन आणि सर्व्हे या दोन्ही गोष्टी सुरू राहतील. ज्या लोकांकडे कुठल्याही नोंदी नाहीत. त्यांचा प्रश्न देखील आपपल्या सोडावावं लागेल त्यामुळे त्या शोधण्याचं काम सुरू आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ निघाताच गुणरत्ने सदावर्तेंचं मोठं विधान, कोर्टाची लढाई पुन्हा सुरू ?
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा मोठा लढा जरांगे पाटलांनी जिकंला,” अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पुर्ण करणारा शेतकरी पुत्र,” मुख्यमंत्री काय काय म्हणाले ?