मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालं असून जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता मोठा दिलासा मिळाला. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची उद्या तातडीची बैठक बोलवली असून पुढची दिशा ठरवली जाणार आहेत. त्यावरून आता शरद पवार गटाने छगन भुजबळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…“हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पुर्ण करणारा शेतकरी पुत्र,” मुख्यमंत्री काय काय म्हणाले ?
मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले आहेत. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल. असे भुजबळांनी म्हटले. त्यावर छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा, असा टोला शरद पवार गटाने लगावला आहे.
हेही वाचा…“तर गावाकडे राहिलेले सर्वच मराठे झाडून मुंबईत येतील”, जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या त्यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी तसेच इतर समाजाच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. सरकारने आज जाहीर केलेल्या सर्व निर्णयावर उद्या पाच वाजता चर्चा करणार असून पुढची दिशा ठरवली जाईल असं छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
छगनरावांनी तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा. https://t.co/wR6MXGbQC4
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) January 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ निघाताच गुणरत्ने सदावर्तेंचं मोठं विधान, कोर्टाची लढाई पुन्हा सुरू ?
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा मोठा लढा जरांगे पाटलांनी जिकंला,” अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..