नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर पजांबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील अशीच भूमिका घेतली तर इंडिया आघाडीतील प्रमुख चेहरा असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केलीय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाममध्ये एकला चला रे चा नारा दिला आहे. अरविंद केजरीवाल स्वबळावर निवडणुका लढवण्याचे म्हणाताहेत. वंचितच्या मनात अजूनही शंकाकुशंका शिल्लक आहेत. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या नावाच्या स्वार्थी कंपूला रामराम केलाय. संजय राऊत आणि पेंग्विन सेनेचा पायगुन पाहिलात का ? जिथे जिथे असतात तिथून लोक तातडीने निघून जातात. असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसेच मलपत्रातून आम्हाला रोज शहाणपण शिकवण्यापेक्षा पेंग्विन सेनेने आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केलीय.
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजद- कॉंग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडलं. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एनडीएसह सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट करणारे नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यातच आता इंडिया आघाडी पुढे काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
◆ ममता बॅनर्जींनी जाहीर केले पश्चिम बंगालमध्ये एकला चलो रे..
◆ केजरीवाल म्हणतात स्वबळावर लढणार
◆ वंचितच्या मनात अजून शंकाकुशंका शिल्लक आहेत किंचित
◆ मा. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी नावाच्या स्वार्थी कंपूला रामराम केला.
◆ श्रीमान संजय राऊत आणि पेंग्विन सेनेचा पायगुण…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 29, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया