मुंबई : सुरूवातीला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या दहाव्या परिशिष्ठाचा नार्वेकर सातत्याने आधार घेत आहेत. त्या परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदमध्ये ही घोषणा करण्यात आलीय. यावरून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नियुक्तीवर टिका केली आहे.
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून राहूल नार्वेकर यांची निवड होणं, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्त्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरोबा करून आलेली आहे. त्याला यापदी नेमणे म्हणजे संवैधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा आहे. अशी टिका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट
दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती केलेली आहे. हाजीहाजी करण्यापलीकडे बिर्ला यांची राजकीय समज काय आहे ? ते आपण खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून पाहिलंच आहे. त्यामु़ळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींची काय चिकित्सा करणार हे वेगळं सांगायला नको. असा टोला देखील आव्हाडांनी ओम बिर्ला यांना लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?