नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपुर्वी आता संपुर्ण देशात राज्यसभा निवडणुकीचा गुलाल उधळणार आहे. देशातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार असून महाराष्ट्रातील पाच जागांसाठी निवडणुक होत आहे. यासंदर्भात आज केंद्रीय निवडणुक आयोगाने घोषणा केली आहे.
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,
महाराष्ट्रातल्या ६ जागांसह देशातल्या ५६ राज्सभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रात प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही, मुरलीधरन, अनिल देसाई, वंदना चव्हाण, कुमार केतकर या खासदारांच्या जागा रिक्त होणार आहेत. सध्या पक्ष तोडफोडीमुळे आता जागांचं समीकरण बदललं आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडून २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतील, तर २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले,” अशी चर्चा, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला