मुंबई : आगामी महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार असल्याने उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागच्या अर्थसंकल्पात भारताची अर्थव्यवस्था ३ वर्षात ५ ट्रिलियन डॉलरवर नेणार असण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारला त्यात अपयश आले. त्यातच आता पुन्हा तीच एकदा घोषणा करण्यात येणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत भाष्य केले आहे.
हेही वाचा…पंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपकडून खासदार होणार ? भाजपची रणनिती ठरली, कुणाचा पत्ता कट होणार ?
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २०१७ साली भारतीय अर्थव्यस्थेचा आवाका २.६५ ट्रिलियन डॉलर इतका होता. त्यावेळी भारताची अर्थव्यस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यस्था होती. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार २०१७ साली युनायटेड किंग्डम २.६४ ट्रिलियन डॉलरसहीत सहाव्या आणि फ्रान्स २.५९ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसहीत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये सातव्या स्थानी होता. मोदी सरकारने २०१९ साली २०२०-२१ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत तर २०२४-२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले होते.
हेही वाचा…“जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ?” भाजपच्या माजी खासदाराचा तिखट सवाल
४ जुलै २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार २०२४-२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरचे उद्दीष्ट गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला पुढील सहा वर्षांमध्ये दर वर्षी १२ टक्क्यांपर्यंत वाढीचा दर संतुलित ठेवणे गरजेचे होते. मात्र, २०१८-१९ या अर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ६.८५ टक्क्यांनी वाढली. तर २०१९-२० अर्थव्यवस्था वाढीचा दर ७ टक्के राहिला. भारतामधील आर्थिक व्यवहरांमध्ये मंदी आल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे होते. २०२४ मध्ये पुन्हा एकदा ५ ट्रिलियन डॉलरचा कित्ता गिरवला जातोय आणि लोकांना मूर्ख बनवलं जातंय. रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे, असा टोला देखील आव्हाडांनी भाजपला लगावला आहे.
पुन्हा एकदा तीच घोषणा… जी २०१९ साली केलेली…
अर्थव्यवस्था ३ वर्षांत ५ ट्रिलियन डॉलरवर!
वाचा सरकार लोकांची कशी दिशाभूल करतंय…
२०१७ साली भारतीय अर्थव्यस्थेचा आवाका २.६५ ट्रिलियन डॉलर इतका होता.
त्यावेळी भारताची अर्थव्यस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यस्था होती.…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 30, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र
हेही वाचापुण्यात मोठा राडा ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…“भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढावं”, प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, छगन भुजबळ संतापले
हेही वाचा…” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”