वाशिम : पुढच्या काही दिवसात लोकसभेच्या जागावाटप झालं नाही तर महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी होईल, असा इशारा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. हालात ए हाजरा मुस्लिम संवाद साधतांना आंबेडकर बोलत होते. तर मात्र दुसरीकडे आमंत्रण असूनही जागा वाटपाच्या बैठकीला जाणं प्रकाश आंबेडकर यांनी टाळलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार का ? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा
आपल्याला कॉंग्रेस ने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांना आता कॉंग्रेससोबत जाऊ नये. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी अर्ध्या जागांवर कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. मात्र त्यांच्यात जागा वाटपावरून अद्याप एकमत होतांना दिसत नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात त्यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला नाही तर त्यांची अवस्था इंडिया सारखी होईल. असे वक्तव आंबेडकरांनी केलंय.
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती. मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे. कारण याचा रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. असा आरोप देखील आंबेडकरांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही, गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचाय”
हेही वाचा…“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र
हेही वाचापुण्यात मोठा राडा ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…“भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढावं”, प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, छगन भुजबळ संतापले