मुंबई : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी त्यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रूग्णालयातच त्यांचं निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार म्हणून ओळखले जात होते. तसेच बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून देखील ओळख होती.
हेही वाचा…“जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही, गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचाय”
शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटी वारीत बाबत सुरूवातीपासून शिंदेंच्या सोबत राहिले. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांनी अपक्ष असलेले सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. १९९०, १९९९,२०१४ आणि २०१९ असे चार वेळा त्यांनी आमदारकी भुषविली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिल बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल टाकले.
हेही वाचा…“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर यांना श्रध्दांजली वाहिली आहे. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र
बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणा आणण्यासाठी, सिंचनासाठी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी तसेच टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा.“प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार”, उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा…“कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अनेक ठिकाणी डपॉझिट जप्त होईल”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान