मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे.
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगात दुमदुवून टाकणाऱ्या महान व्यक्तींचा त्या त्या. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्काराची सुरूवात १९९५ साली युती सरकार असतांना करण्यात आली.
हेही वाचा…पुण्यात मोठा राडा ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असून साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन यांसारख्या विविध क्षेत्रांतील अपवादात्मक कामगिरीची दखल या पुरस्कारच्या वेळी दखल घेण्यात येते. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे प्रथम प्राप्तकर्ते असताना 1996 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे स्वरूप २०२३ च्या निकषानुसार विजेत्याला २५ लाख रूपये रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. सुरूवातीला पुर्वी ५ लाख रूपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. सप्टेंबर २०१२ मद्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून या पुरस्काराची रक्क्म ५ लाख रूपयांवरून १० लाख रूपये करण्यात आली होती. त्यानंतर वाढवण्यात आली.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024
READ ALSO :
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा.“प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार”, उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा…“कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अनेक ठिकाणी डपॉझिट जप्त होईल”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
हेही वाचा…“जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही, गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचाय”
हेही वाचा…“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला