मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर वंचित महाविकास आघाडीत येण्यासाठी सुरूवातीपासून आग्रही होती. वंचितसोबत युती करण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली होती. परंतु वंचितसोबत महाविकास आघाडीची अधिकृतरित्या नव्हती. यातच आता महाविकास आघाडीने वंचितबाबत मोठी भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडली आहे. यातच या बैठकीत वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिकृत पत्रक काढण्यात आले आहे. त्यावर त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र
महाविकास आघाडीकडून वंचितबाबत काढण्यात आलेलं पत्रक
देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात.
आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा.“प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार”, उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा…“कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अनेक ठिकाणी डपॉझिट जप्त होईल”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
हेही वाचा…“जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही, गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचाय”