मुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर वंचित महाविकास आघाडीत येण्यासाठी सुरूवातीपासून आग्रही होती. वंचितसोबत युती करण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली होती. परंतु वंचितसोबत महाविकास आघाडीची अधिकृतरित्या नव्हती. यातच आता महाविकास आघाडीने वंचितबाबत मोठी भूमिका घेतली आहे. त्यावर वंचितने देखील महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव स्विकारला आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अनेक ठिकाणी डपॉझिट जप्त होईल”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
महाविकास आघाडीने काढलेल्या पत्रकावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षांचा योग्य सन्मान नाही दिला गेला आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत पत्रांवर सही करण्याचे अधिकार नाना पटोले यांना आहेत की नाही याबद्दल कॉंग्रेस हायकमांट किंवा रमेश चेन्नीथला यांनी माहिती दिली नसतानाही, वंचित बहुजन आघाडीची प्राथमिकता भाजप-आरएसएसचा पराभव करणे असल्याने आम्ही पुढच्या बैठकीत महाविकास आघाडीसोबत सामील होणार आहोत. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही, गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचाय”
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडली आहे. यातच या बैठकीत वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिकृत पत्रक काढण्यात आले आहे. त्यावर त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीकडून वंचितबाबत काढण्यात आलेलं पत्रक
देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात.
आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षांचा योग्य सन्मान नाही दिला गेला आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत पत्रांवर सही करण्याचे अधिकार नाना पटोले यांना आहेत की नाही याबद्दल AICC किंवा रमेश चेन्नीथाला यांनी माहिती दिली नसतानाही,… pic.twitter.com/U3yZCbVMWk
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) January 30, 2024
READ ALSO :
हेही वाचा…पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा.“प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार”, उपमुख्यमंत्री अजित पवार