मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. वाशीत मनोज जरांगे पाटलांचं आंदोनल आले असता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसुचना काढण्यात आली आहे. यावर १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. परंतु त्याआधीच सरकारच्या अधिसूनेच्या विरोधात ओबीसी समाजाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
हेही वाचा….“प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार”, उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा आरक्षणाबाबात घेतलेल्या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलं आहे. सगेसोयरे व गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राताद्वारे कुणबी दाखल देण्यासाठी काढण्यात आलेल्या २६ जानेवारीच्या मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान दिले आहे. ओबीसी वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे अॅड मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अनेक ठिकाणी डपॉझिट जप्त होईल”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरमध्ये ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्यात आली आहे. बबनराव तायवाडे आणि किरण पांडव यांच्या नेतृत्वात आजपासून रथयात्रेला देखील सुरूवात होणार आहे. ओबीसी जनगणनेसह विविध मागण्यांसाठी जनसंवाद देखील यावेळी साधण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा….महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव वंचिने स्विकारला, लोकसभा निवडणूक महायुतीला जड जाणार ?
हेही वाचा…पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल