मुंबई : गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. सुरूवातीला खिचडी घोटाळ्यावरून सुरज चव्हाण यांची चौकशी करण्यात आली. तर काल ठाकरे गटाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कथित बॉडी बॅग घोटाळ्यावरून ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. परंतु मुंबई महापालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत. ते भाजप आणि शिंदे गटात सामील झाले आहेत. खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा. त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत ? ते जाहीर करा. असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर आता राहूल कनाल यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब
खिचडी घोटाळ्याचे खरे लाभार्थी राहुल कनाल, अमेय घोले, वैभव थोरात असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर आज राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर हल्लाबोल केला. खिचडी घोटाळा झाला आहे. त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नाव आली असून आमची नाव आली तर आम्ही दोघेही राजकारणाचा त्याग करणार. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर का मांडीवर घेऊन बसतात. आरोप खोटे ठरल्यास तुम्ही राजीनामा देणार का ? असा सवाल देखील कनाल यांनी राऊतांना केला. तसेच सुरू तुम्ही केलं आहे. परंतु याचा शेवट मी करणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
आरोपामध्ये काहीही तथ्य़ नसतांना बोलणं योग्य नाही. कोणत्या प्रकारे आणि कोणत्या थराला संजय राऊत साहेब बोलतायत ते आमचे आदरणीय नेते होते आणि आहेत. परंतु त्यांनी काल जे वाक्य वापरलं . ज्या यंत्रणांची चौकशी लागली आहे. सत्तेत असणाऱ्यांना चौकशी लागत नाही. असे म्हटले तर मी सांगतो की काही कारकुणांची २०२२ सालापासून चौकशी सुरू होती. माझ्यावर त्या काळात कोणतीही केस नाही. केवळ प्रेमापोटी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो आहे. असेही राहुल कनाल यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी, मुंबई महापालिकेचा अजब कारभावर, आव्हाडांचा सरकारवर संताप
हेही वाचा…जळगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार..! शरद पवारांचा ‘हा’ खंदा शिलेदार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात
हेही वाचा..मोठी बातमी..! मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात पहिली याचिका दाखल, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, पण..
हेही वाचा….महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव वंचिने स्विकारला, लोकसभा निवडणूक महायुतीला जड जाणार ?
हेही वाचा…पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार