मुंबई : दोन वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने ४ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरातील विकासकामांसाठी ३६आमदारांमार्फत निधी खर्च करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार आमदारांना विकास निधी वाटप करण्यात आला आहे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना भरभरून निधीवाटप करण्यात आले तर विरोधी पक्षातील एकाही आमदाराला निधी न दिल्यावरून एकच वाद निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबईतील ३६ आमदारांपैकी २१ आमदार सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटाचे. तर १५ आमदार विरोधी पक्षांचे आहेत. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आमदारांना नागरी कामांसाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचा ठराव प्रशासनाने फेब्रवारी महिन्यात मांडला . परंतु यात सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्यात आल्याने राज्य सरकारवर एकच टिका करण्यात येत आहे.
हेही वाचा..” संपुर्ण देशात २०० आमदार व ३०० खासदार असूनही भाजप..,”सुप्रिया सुळेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
दोन वर्षांपासून निवडणूक न झालेल्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासक निधीवाटपाच्या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कसा दुजाभाव करत आहेत हे माहिती अधिकारा अंतर्गत उघड झाले आहे. मुंबईचे महत्त्व मिळेल त्या वाटेने कमी करण्यासाठी झटणारे सत्ताधारी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत आहेत. म्हणजे तुमच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तरंच तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होतील. कारण वारंवार मागणी करूनही विरोधी आमदारांना निधीच उपलब्ध करून दिला जात नाही.असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकीकडे इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर, मुंबई हा प्रकल्प गुजरातमध्ये अहमदाबाद येथे स्थलांतरित करण्यात आला. डायमंड बोर्स, मुंबई हा प्रकल्प गुजरात मधील सुरत येथे स्थलांतरित करण्यात आला. मरीन अकॅडमी हा प्रकल्प पालघर मध्ये अपेक्षित असताना तो गुजरात येथील द्वारका येथे स्थलांतरित करण्यात आला. वलक ड्रग पार्क, रायगड येथे होणारा हा प्रकल्प गुजरात येथील भरूच येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केवळ सत्ताधारी गटातील आमदारांनाच निधी वाटप करण्यात येत असून, विरोधी पक्षातील आमदारांच्या सोबत तसेच त्यांच्या मतदारांच्या सोबत दूजाभाव करण्यात येत आहे.
थोडक्यात मुंबईकरांची दोन्ही बाजूने प्रचंड पिळवणूक सुरू आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल मुख्यमंत्र्यांसोबत रस्ते साफ करताना दिसतात. परंतु निधीवाटपासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत . यावरून ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव करत असण्यावर शिक्कामोर्तब झालंय. असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
दोन वर्षांपासून निवडणूक न झालेल्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासक निधीवाटपाच्या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कसा दुजाभाव करत आहेत हे माहिती अधिकाराअंतर्गत उघड झाले आहे. मुंबईचे महत्त्व मिळेल त्या वाटेने कमी करण्यासाठी झटणारे सत्ताधारी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत… pic.twitter.com/1Je0MudA5R
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 31, 2024
READ ALSO :
हेही वाचा…जळगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार..! शरद पवारांचा ‘हा’ खंदा शिलेदार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात
हेही वाचा..मोठी बातमी..! मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात पहिली याचिका दाखल, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, पण..
हेही वाचा….महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव वंचिने स्विकारला, लोकसभा निवडणूक महायुतीला जड जाणार ?
हेही वाचा…पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब