पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस दलात बदल्या सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात १३ जानेवारील रोजी एसीआय आणि पीएसआयच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातच आता मंगळवारी राज्यातील तब्बल १३० पीआयच्या सामुहिक बदल्या करण्यात आल्याने याची राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी, मुंबई महापालिकेचा अजब कारभावर, आव्हाडांचा सरकारवर संताप
महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाकडून करण्यात आलेल्या १३० बदल्यांपैकी २० टक्के अधिकारी हे पिंपरी चिंचवडमधीलच आहेत. तेथील २७ पीआयच्या बदल्या झाल्या असून त्यापैकी २४ जण पिंपरी चिंचवड शहरात दाखल असणार आहेत. तर उद्योगनगरीतील बहुतांश बदली झालेले पोलिस अधिकारी नागपुरला गेले आहेत. यामागील शंका आपचे नेते चेतन बेंद्र यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…जळगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार..! शरद पवारांचा ‘हा’ खंदा शिलेदार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात
आपचे नेते चेतन बेंद्रे यांनी याबाबत एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, नागपुर शहरातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. भाजप निवडणुक जिंकण्यासाठी काहीही करू शकते. असं म्हणत त्यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड शहरातील २७ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच राज्याच्या विविध भागामधून २४ पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली की नाही ? कॉंग्रेसकडून या घटनेचा मोठा खुलासा
हेही वाचा…“विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी मुंबईकरांवर सूड कशाला उगवताहेत ?”
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा पुणे दौरा, नरेंद्र मोदींना यंदाचा ‘शिव पुरस्कार’ जाहीर
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या,” राहुल कनालचं संजय राऊतांना आव्हान