मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यावर अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशाच्या विरोधात येत्या १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या अध्यादेशाला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. यातच आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकारी आणि तहसिलदारांना ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील निवेदन देऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
हेही वाचा…“विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी मुंबईकरांवर सूड कशाला उगवताहेत ?”
मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या आपल्याला संपुर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे, या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे. ओबीसींसह सर्वच मागासवर्गीय जाती-जमातींच्या बांधवांनी व संघटनांनी १फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकारी आणि तहसिलदारांना ओबीसी आरत्रण बचवा संदर्भातील मागण्यांचे निवेदन सुपूर्द करावे. तसेच याच दिवशी आपापल्या मतदारसंघातील विधानसभा, आमदार विधानपरिषद आमदार तसेच खासदार यांचे कार्यालयावर किंवा निवासस्थानी निदर्शने करून त्यांनाही निवेदन द्यावे, असे छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
सर्व आमदार खासदारांना ओबीसी, भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना त्यांचीही गरज आहे. याची जाणीव करून द्या. ओबीसींच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य वाचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांच्या खांद्यावर आहे. उद्या आपण मागे राहिलात तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत. असेही भुजबळांनी म्हटलेय.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाने केली १४ प्रवत्यांची नियुक्ती, मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर अमोल मिटकरी..
हेही वाचा“महाविकास आघाडीत अद्यापही वंचितचा समावेश झाला नाही,” प्रकाश आंबेडकर म्हणाले…
हेही वाचा…“पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित”, 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
हेही वाचा…“महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल १३० पीआयच्या बदल्या, आम आदमा पार्टीने उपस्थित केली शंका”
हेही वाचा…राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली की नाही ? कॉंग्रेसकडून या घटनेचा मोठा खुलासा