मुंबई : महाराष्ट्रात या वर्षी जानेवरी ते मार्च या महिन्यात तब्बल ५५१० मुली महाराष्ट्रातून बेपत्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तरूण मुली खरचं सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी याबाबत सरकारने लक्ष घालावे अशी मागणी केली जा त आहे. यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
हेही वाचा…“राज्यात पुन्हा ‘भिररर’ चा थरार रंगणार, कोर्टाने ‘बैलगाडा’ शर्यतीवरील बंदी उठवली”
अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्य हे शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असल्याचे मागील कित्येक वर्षाच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिद्ध झालं आहे. तथापी अशा पुरोगामी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे विविध घटनांमधून निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीत अशीच धक्कादायक बाब उघडकीस आली असून महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी, ते मार्च २०२३ कालावधीत राज्यातू सुमारे ५५१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती
जानेवारी २०२३ या महिन्यात १६०० मुली तर फेब्रुवारी महिन्यात १८१० तर मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणा-या मुली व महिलांचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक आहे. महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्या असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुली व महिला सुरक्षीत नसेल तर सदर बाब राज्यासाठी चिंताजनक आहे. त्यामुळे फडणवीस यांनी याबाबत कारवाई करावी असंही दानवे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया