अकोला : नाशिक, नगर आणि अकोल्यातील घटनांवरून महाराष्ट्रामध्ये धार्मिक ताण तणाव निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे. अकोल्यातील घटनेच्या मागे खरा सुत्राधार कोण आहे.? याचा तपास घेतला पाहिजे. सध्या माणुसकीचं संपवण्याचं पाप पुरोगामी महाराष्ट्रात होत असेल तर हे कदापी काॅंग्रेस सहन करणार नाही. त्यामुळे तेथील लोकांनी बंधूभाव आणि सयंमाने एकत्रित राहावं, असं आवाहन करण्यासाठी अकोल्यात जात असल्याची प्रतिक्रिया काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती
समीर वानखेडे प्रकरणावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की, “समीर वानखेडे प्रकरणात भाजपचे नेते बेंबीच्या तेठापासून बोंबलायला लागले आहेत. एका अधिकाऱ्याला सीबीआय त्रास देत असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून केलं जात आहे. देशातील संविधानिक संस्थाचा कशापद्धतीने वापर केला जात आहे. ते आपण सर्वजण पाहत आहोत. त्याच्यावर कारवाई होत असेल अन् त्यावर भाजपच्या नेते ओरडायला लागले असतील. तर काय चाललंय महाराष्ट्रात. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्रा माझा. अशी सांगण्याची वेळ आली आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. असा महाराष्ट्रा कधीच नव्हता. महाराष्ट्राची बरबादी करण्याचा कार्यक्रम भाजपने ठरवून केला आहे का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे. आज भाजपचे उपमुख्यमंत्र्यापासून ते मंत्र्यापर्यंत सगळेच जण समीर वानखेडेंची बाजू घेत आहेत.” असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडी फुटायला सुरूवात, राष्ट्रवादीमध्ये अधिक जास्त….”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
दरम्यान, जो माणुसकीचा खुन करायला चाललाय आहे. त्याला कोणीही माफ करू शकत नाही. त्यामुळे अकोला, नगर जिल्ह्यात ज्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांची योग्य ती चौकशी व्हावी. अन् जे दोषी आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले अकोला जिल्ह्यात जाणार असून तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“राज्यात पुन्हा ‘भिररर’ चा थरार रंगणार, कोर्टाने ‘बैलगाडा’ शर्यतीवरील बंदी उठवली”