पुणे : महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा राज्य सरकारचा कायदा वैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. त्यामुळे बारा वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीत संदर्भात महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा हा प्राण्यांचा छळ करणारा नाही. त्यामुळे विधिमंडळानं केलेल्या कायद्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिण निवडणुकीत पुन्हा एकत्र..? बीडच्या राजकारणात एकच चर्चा
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री असताना यावर कायदा केला. त्यानंतर पुन्हा याबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. त्यात बैलगाडा हा धावणारा प्राणी नाही. त्यामुळे हा कायदा अवैध आहे. त्यानंतर त्या कायद्याला कोर्टाने स्थगिती दिली. त्यावर बैल हा धावणारा प्राणी आहे. असा रिपोर्ट आम्ही तयार करून कोर्टात सादर केला. त्यावर आता पुन्हा आमचं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही प्रयत्न केलेत. अन् त्यांना यश आलं. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा
आमचं सरकार आल्यानंतर तुषार मेहता यांनी महाराष्ट्राच्या वतीने बैल हा धावणारा प्राणी आहे. यावर युक्तिवाद केला. त्यात हा कायदा वैध आहे अन् यात सर्व अटीशर्ती मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज कोर्टाच्या निकालानंतर मला आनंद झालं आहे. कारण आम्ही केलेला कायदा हा संपुर्ण संविधानिक असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. हा शेतकऱ्याचा मोठा विजय आहे. महाराष्ट्राचा विजय आहे. असंही फडणवीसांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात पुन्हा ‘भिररर’ चा थरार रंगणार, कोर्टाने ‘बैलगाडा’ शर्यतीवरील बंदी उठवली”
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…“महाविकास आघाडी फुटायला सुरूवात, राष्ट्रवादीमध्ये अधिक जास्त….”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा…‘भाजप’ही लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत, कार्यकारिणीची बैठकीनंतर…
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?