मुंबई : राज्यात मागील काही वर्षापासून दोन महत्वाच्या पक्षात मोठी फुट पडली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर काही ठिकाणी असंतोषाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालं आहे. आता याच पार्श्वभूमीवर जे पक्षातून फुटले आहेत किंवा पक्षात फुटतात त्यांना तात्काळ पदावरून दुर करा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’
मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी मेनन यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात त्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी पक्ष फुटीबाबत उच्च न्यायालयात भारतीय संविधानच्या कलम १० च पॅरा क्रमांक ४ हटवण्यात यावा अशीही मोठी मागणी केली आहे. देश पातळीवर अनेक राजकीय पक्षात फुट पडत असते. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये ही मोठ्या प्रमाणात पक्ष फुटीच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”
दरम्यान, सुरूवातीला शिवसेनेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फुट पडली. देशात पक्षांतर बंदी कायदा आहे मात्र या कायद्याचं कलम १० च मुद्दा क्रमांक ४ हे पक्षांतरास पोत्साहन देणारं कलम आहे. त्यामुळे हे कलम रद्द करावं अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. तसेच या कायद्याचं उल्लंघन ज्यांनी केलं त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. घटनेच्या शेड्युल १० नुसार २/३ आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात, मात्र, बाहेर पडल्यानंतर त्यांना इतर कोणत्या तरी पक्षात जावं लागतं. मात्र महाराष्ट्रात असं होतांना दिसत नाही. त्यामुळे याबाबत न्यायालयाने योग्य निर्णय घ्यावा, असंही याचिकेत सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईतील इंडियाच्या बैठकीला महायुतीकडून शह, त्याच दिवशी बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”
हेही वाचा…“जनतेला बनवलं भिकारी आणि म्हणे शासन आपल्या दारी”
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”