मुंबई : राज्याचे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड, बारामती आणि बीडमध्ये झालेले स्वागत पाहून आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी झालो, त्याला जनतेमधून पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला होणारी उत्तरदायित्व सभा तिथल्या सर्वात मोठ्या तपोवन मैदानात घेतली जाईल, अशी घोषणा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा
बीडनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा मंत्री हसन मुक्षीफ यांच्या जिल्ह्यात झाली. त्यानंतर आता अजित पवार गटाची देखील सभा होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेले तीनही पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक वरळी डोम, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. असंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व पक्षांचा समन्वय राखण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“जनतेला बनवलं भिकारी आणि म्हणे शासन आपल्या दारी”
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”