कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या प्रकरणानंतर आता दोन्ही गटाच्या जाहीर सभा होत आहेत. या सभांमधून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी होतांना दिसत आहे. बीडमध्ये शरद पवारांची सभा झाल्यानंतर काल त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाने सभा घेत जोरदार हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे यांनी अजित पवारांबाबत एक भाकित केलं आहे.
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”
संभाजी राजे म्हणाले की, मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांकडे परततील, हा सर्व ठरवून झालेला प्लॅन आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे. असं संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून महायुतीच्या सत्तेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी सर्वात जास्त उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद झाली. यातच आता अजित पवार यांना मुख्यमंत्री देण्यात येणार आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी भाष्य केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”
हेही वाचा…““सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत”
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका