हिंगोली : 110 आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागत आहे. इंडिया आघाडीचे इंजिन आणि गार्ड बघण्यापेक्षा चंद्रकांत पाटील आपण कोणाच्या पाठिंब्याने घटनाबाह्य सरकार बनिवले आहेत, याचे चिंतन करावे. असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्या अजित पवार यांच्यावर आपण ७० हजार कोटींचे आरोप केले होते. त्यांना सरकारमध्ये सामावून घेण्यावेळी आपली विवेकशीलता काय गहाण ठेवली होती का ? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांना केला आहे. काल हिंगोली येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?
दरम्यान, दिवसेंदिवस शासकीय योजनांच्य लाभार्थ्यांची नावे वगळली जात असून बहुतांश शेतकऱ्यांना योजनांचा लाभच मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दानवेंकडे केली. आगामी काळात त्यांचे निराकरण करून न्याय मिळवून देईल. अशी ग्वाही यावेळी दानवेंनी शेतकऱ्यांना दिली.
११० आमदार असून सुद्धा भारतीय जनता पक्षाला गद्दार एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागत आहे. I.N.D.I.A आघाडीचे इंजिन आणि गार्ड बघण्यापेक्षा चंद्रकांत पाटील आपण कोणाच्या पाठिंब्याने घटनाबाह्य सरकार बनविले आहेत,याचे चिंतन करावे. ज्या अजित पवार यांच्यावर आपण ७० हजार… pic.twitter.com/xGHhtn9FUM
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…