अमरावती : अमरावती जिल्हा रूग्णालयात गेल्या तीन तासांपासून बत्तीगुल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे रूग्णालयातील रूग्णांचे प्रचंड हाल सुरू झाले आहे. याविषयी सगळीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची पाहणी करण्यासाठी गेले असता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला चांगलचं धारेवर धरलंय.
हेही वाचा…“महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात भाजप काॅंग्रेसला फोडू शकणार नाही”
अमरावती येथील जिल्हा रूग्णालयात विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने आजारी रूग्णांचे प्रचंड हाल झाले. जिल्हा रूग्णालयाकडे प्रशासन, शासन, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. एका एक दिवसांची बालके घेऊन गरोदर महिला बाहेर बसल्या आहेत. उद्या एखाद्या बालकाचा जीव जाईल.ठाण्यात १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्या असल्याचीही टिका वडेट्टीवारांनी केलीय.
हेही वाचा…“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला..,” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, सगळीकडे भ्रष्टाचार सुरूय. रूग्ण कल्याण निधीतून जनरेटर का लावण्यात येत नाही. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकांसाठी व्यवस्था असली पाहिजे.. हजारो रूग्ण रूग्णालयात भरती होती. तर सगळीकडे आता डेंग्यू, मलेरिया, टायफॉईटचे रूग्ण आहेत. अशा स्थितीत वीज नाही. डासांमुळे नवीन जन्माला आलेल्या बालकांच जीव घोक्यात आला आहे. संबंधिकांवर कारवाई करण्यास येईल असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा
हेही वाचा…“अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ?” बंडखोर आमदारानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं