मुंबई : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीनत देखील बंडखोरी झाली, मात्र पाहिजे तसा विरोध राष्ट्रवादीत दिसत नाही. राष्ट्रवादीचा एक सत्तेत तर दुसरा गट विरोधात आहे. परंतु पक्षात कोणतीही फुट झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यातच शिवसेनेतील शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टिका केली जातेय. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाठ यांनी भाष्य केलंय.
हेही वाचा…“नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात, “, मलिकांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवलं?
शरद पवार हे जे बोलतात ते करत नाहीत. तुमच्या आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी बडबड करणाऱ्या भोंग्यांना लाथ मारून बाहेर काढले पाहिजे. सुप्रिया सुळे यांना पुढे आणायचे आहे. अजित पवार सभा घेत आहेत, ती सभा शरद पवार यांना चॅंलेज करणारी सभा नाही. उद्धव ठाकरे जे सभा घेत आहेत, त्यातून काही होणार आहे का ? अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?
दरम्यान, शरद पवार यांच्या सभेनंतर आता अजित पवार गटाची उद्या २७ ऑगस्ट रोजी सभा होत आहे. अजित पवारांच्या या सभेच्या निमित्ताने अजित पवार गटाचे बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी संपूर्ण बीड शहरात मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. बीडमध्ये लागलेल्या अजित पवारांच्या स्वागत बॅनरवती शरद पवारांचे फोटो अद्यापही कायम आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं
हेही वाचा…“महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात भाजप काॅंग्रेसला फोडू शकणार नाही”
हेही वाचा…“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला..,” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
हेही वाचा…“शिवसेना काॅंग्रेस सत्तेत आहे, काॅंग्रेसला थोडं थांबवलंय”, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून खळबळ
हेही वाचा…“भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकताच उरली नाहीय”