मुंबई : मनी लॉंड्रिंग प्रकरणातून वैद्यकीय जामीनावर आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांची मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून मुक्तता करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी आता मंत्री छगन भुजबळ समर्थक शिवाजीराव नलावडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील”
वैद्यकीय जामीनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिकांची दोन्ही गटातील नेत्यांनी भेट घेतली. अजित पवारांसह,जयंत पाटलांनी देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यातच नवाब मलिक कोणत्या गटात जाणार ? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. सध्या कोणत्याही राजकीय परिस्थितीबाबत भाष्य नाही. सद्या आरोग्याकडे लक्ष देणार असल्याचं नवाब मलिकांच्या बंधूनी सांगितलं होतं. तर मी कोणत्याही गटात नाही, मी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात असल्याचं नवाब मलिकांनी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा…“सत्ताकारण जरूर करावं पण.., ” सध्याच्या राजकारणावर गडकरींची नेत्यांना चपराक
यातच आता नवाब मलिकांनी शरद पवार यांना पाठिंबा दिल्याने त्यांची मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून मुक्तता करण्यात येणार असल्याचं संकेत मिळत आहे. यातच काल शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भाष्य केलं होतं. नवाब भाई राष्ट्रवादीचे नेते त्यांनी सरकारच्या गोष्टीवर टीका केली म्हणून त्यांना तुरूंगात टाकले. काही नसताना भीती घालायची म्हणून मला इडी नोटीस पाठवली. सत्तेचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास द्यायला होत आहे. असंही त्यांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास
हेही वाचा…“भाजप अन् मोदी यांची सत्ता काढून नव्या पिढीच्या हाती देणं महत्वाचं”, शरद पवारांचं सुचक विधान
हेही वाचा…“मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर..,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले”, विरोधी पक्ष नेत्याचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल