जळगाव : शिवसेना आणि काॅंग्रेस सत्तेत आली आहे. सध्या काॅंग्रेसला थांबवलं आहे. त्यामुळे राज्यात सर्वपक्षीय सत्ता आहे. असं विधान कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. यावर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास
मुंगेरीलाल के हसीन सपने सारखे गिरीश महाजन काॅंग्रेसकडे पाहत आहेत. गिरीश महाजन काय गिरीश महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात काॅंग्रेस फोडू शकणार नाही इतक्या दाव्याने सांगतो, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…“भाजप अन् मोदी यांची सत्ता काढून नव्या पिढीच्या हाती देणं महत्वाचं”, शरद पवारांचं सुचक विधान
दरम्यान, सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगलं सुरू आहे. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार काम करीत आहेत. या सरकारमध्ये सर्व पक्ष दिसत आहेत. आता कुणीच सुटलेलं नाही. या सरकारमध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादीही आहे. परंतु काॅंग्रेसला सध्या थांबवलेलं आहे. असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला..,” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
हेही वाचा…“शिवसेना काॅंग्रेस सत्तेत आहे, काॅंग्रेसला थोडं थांबवलंय”, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून खळबळ
हेही वाचा…“भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकताच उरली नाहीय”
हेही वाचा…“नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात, “, मलिकांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवलं?
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?