मुंबई : राज्यात एव्हाना देशात पक्ष फुट, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, धार्मिक तेढ, जातीय दंगली याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला २८ तर महायुतीला फक्त २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले”, विरोधी पक्ष नेत्याचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल आणि महाराष्ट्रात भाजपला लोकसभेला फारशी परिमाणकारक कामगिरी करता येणार नाही, असे सर्व्हे अलीकडे प्रसिद्ध झालेत. मात्र, मला या सर्वेक्षणांबाबत कोणतीही माहिती नाही, परंतु, मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे. सार्वजनिक जीवनात काम केलं आहे. त्यावरून आगामी काळात जनतेला परिवर्तन हवे आहे. भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकता नाही. असंही शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील”
दरम्यान, इंडिया टुडेने घेतलेल्या सर्व्हेमध्ये बंडखोरांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काॅंग्रेसचे ११ खासदार, आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे १८ लोकसभेत खासदार निवडून येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात, “, मलिकांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवलं?
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास
हेही वाचा…“भाजप अन् मोदी यांची सत्ता काढून नव्या पिढीच्या हाती देणं महत्वाचं”, शरद पवारांचं सुचक विधान
हेही वाचा…“मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर..,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर