ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भरसभेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागलीय. बिळातील साप बाहेर पडू लागल्यांना त्यांना ठेचण्यासाठी पायतानाचा वापर करावा लागेल. असं म्हटलं होतं. त्यावर हसन मुश्रीफांनीही प्रत्युत्तर दिलं. यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुश्रीफांवर पलटवार केलाय.
हेही वाचा…“अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ?” बंडखोर आमदारानी दिलं चॅलेंज
जितेंद्र आव्हाडांच्या टिकेनंतर मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलं. जितेंद्र आव्हाड हे मला फार ज्युनिअर आहेत. त्यांनी शरद पवारांवर काय जादू केली हे मला माहिती नाही. ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष संपवण्याचं काम त्यांनी केलं. कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पली नाही. कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती करकर वाजते. ती बसली की कळेल त्याला असं मुश्रीफांनी म्हटलं.
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं
दरम्यान, हसन मुश्रीफ साहेब मी कोल्हापूरच्या सभेत आपलं नाव देखिल घेतलं नव्हतं. आपण माझ्यावर वैयक्तिक का टिका केली हे समजलेच नाही. कोल्हापूरकरांच्या मनात साहेबांविषयी असलेलं प्रेम त्या ठिकाणी झालेली गर्दी आणि साहेबांचं झालेले स्वागतं यामुळे तुम्ही अस्वस्थ झालात हे मी समजू शकतो. असुद्या… एका छोट्या कार्यकर्त्यावर एवढ्या मोठ्या व्यक्तीने टिका करणं हे कधीतरी बर असत.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा