मुंबई : राजकीय फायद्यासाठी भाजपने देशात द्वेषाची बीजे रोवली आहेत. त्याचा परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. भाजपने राजकीय फायद्यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या. त्यानंतर भाजपने सवर्ण आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यातून अगोदर भीमा कोरेगावची दंगल घडवली. असा आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केलीय.
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित लोक सातत्याने मुस्लीम आणि दलितांबद्दल द्वेषाची पेरणी करत आहेत. त्यातूनच सामाजिक ऐक्याला तडे गेले असून हेरगाव सारख्या घटना घडत आहेत. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील नाना पटोले यांनी राज्य सरकावर केली आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का ?” बंडखोर आमदारानी दिलं चॅलेंज
दरम्यान, शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलीत आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे प्रकरण सुद्धा इतर प्रकरणांप्रमाने दाबण्यात येईल ? दलित, ओबीसी, आदिवासी भाजपमध्ये वापरासाठी आहेत. असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
हेही वाचा…“बच्चू कडू कोण रे बाबा..! ? अशा गल्लीबोळातल्या…,” शरद पवारांनी बच्चू कडूंना फटकारलं
दरम्यान, पुढे बोलातांना ते म्हणाले की, त्यांना वापरा आणि फेका अशी भाजपची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री,गृहमंत्री आपल्या राज्यातील अश्या घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठं मोठे वल्गना करतात. इकडे त्यांच्याच राज्यात समाज मन संतप्त करणाऱ्या अश्या दुःखद घटना घडत आहे. या घटना राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहे. या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी.अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही; गरज आहे ती गुन्हेगारांना शिक्षा देण्याची.
READ ALSO :
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?