हिंगोली : आगामी लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार देशात दंगली घडवू शकते, याकडे लक्ष द्या. राममंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून हिंदू लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. पण हा सोहळा झाल्यानंतर हिंदू घरी परतताना एखाद्या मुस्लीम भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात. अशी शक्यता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हिंगोलीच्या सभेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा…अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?
हिंगोलीत काल उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र शासनाच्या सबका साथ सबका विकास हा नारा दिला. पण निवडणुक झाल्यानंतर सबको लाथ अन् दोस्तांचा विकास हे उद्योग केले आहेत. भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर आम्हालाही त्यांची मित्रशाली संपवायची आहे. भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा भाजपला अधिकार नसल्याचंही ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा…कोकणातील लोकसभेच्या ‘या’ जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष ? ठाकरेंना होणार मोठा फायदा
दरम्यान, इंडिया ही देशभक्तांची एकजूट आहे. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आल्यानंतर पंतप्रधानांनी आमची तुलना इंडियन मुजाहिदीन बरोबर केली. मग वर्ल्ड कपचा भारत पाकिस्तानचा सामना गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडीयमवर कसा चालतो? असा सवाल करीत आम्हाला देशप्रेमाचे धडे भाजपने शिकवू नये. अस म्हणत ठाकरेंनी भाजपला सुनावलं.
READ ALSO :
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला
हेही वाचा…जिल्हा रूग्णालयात तीन तास बत्ती गुल, वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, सगळीकडे भ्रष्टाचार…
हेही वाचा…जेसीपीच्या साह्यातून फुलांची उधळण, अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत