मुंबई : काल राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांच्या सभांचा धुमधडाका उडाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेला उत्तर सभा म्हणून अजित पवार गटाची काल बीडमध्ये सभा झाली. तर दुसऱ्या बाजूला हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर सभेमधून जोरदार हल्ला चढवला. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य केलंय.
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
बीडमध्ये काल जबरदस्तीने आणलेली लोकं होती. असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. तसेच उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेत जिवंतपणा होता. पण बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत मुडदाडपणा होता. लोकांची बसण्याची इच्छा नव्हती. असंही त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारचा आशीर्वाद असला की कोणता ही पक्ष बळकावता येतो हा विश्वास पक्ष फोडणाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा जनतेचा विश्वास गमावल्याची खंत अनेक लोक व्यक्त करतायत. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
दरम्यान, शरद पवारांच्या सभेला उत्तर प्रतिसभा घेऊन दिलं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी १०० टक्के फूटली आहे. ९ आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार म्हणतात मोदींसारखा काम करणारा कोणी नाही. हा साक्षात्कार त्यांना १० ते २० वर्षापूर्वी का झाला नाही ? अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले आहेत. असा टोला देखील विजय वडेट्टीवारांनी लगावलाय.
बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत बळजबरीने आणलेली लोक होते. उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता. तसे ही हे लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार का?@VijayWadettiwar
— Office Of Vijay Wadettiwar (@OfficeOfVW) August 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”
हेही वाचा…““सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत”
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”