मुंबई : काल राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांच्या सभांचा धुमधडाका उडाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेला उत्तर सभा म्हणून अजित पवार गटाची काल बीडमध्ये सभा झाली. तर दुसऱ्या बाजूला हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर सभेमधून जोरदार हल्ला चढवला. आता याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य केलंय.
हेही वाचा…“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,
बीडमध्ये काल जबरदस्तीने आणलेली लोकं होती. असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. तसेच उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेत जिवंतपणा होता. पण बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत मुडदाडपणा होता. लोकांची बसण्याची इच्छा नव्हती. असंही त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारचा आशीर्वाद असला की कोणता ही पक्ष बळकावता येतो हा विश्वास पक्ष फोडणाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा जनतेचा विश्वास गमावल्याची खंत अनेक लोक व्यक्त करतायत. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला
दरम्यान, शरद पवारांच्या सभेला उत्तर प्रतिसभा घेऊन दिलं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी १०० टक्के फूटली आहे. ९ आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार म्हणतात मोदींसारखा काम करणारा कोणी नाही. हा साक्षात्कार त्यांना १० ते २० वर्षापूर्वी का झाला नाही ? अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले आहेत. असा टोला देखील विजय वडेट्टीवारांनी लगावलाय.
मा. @PawarSpeaks साहेबांच्या सभेला उत्तर प्रतिसभा घेऊन दिलं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी १०० टक्के फूटली आहे. ९ आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत. @AjitPawarSpeaks म्हणतात मोदींसारखा काम करणारा कोणी नाही. हा साक्षात्कार त्यांना१०-२० वर्षांपूर्वी का झाला नाही ?@VijayWadettiwar
— Office Of Vijay Wadettiwar (@OfficeOfVW) August 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…““सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत”
हेही वाचा…“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका
हेही वाचा…“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”
हेही वाचा…“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”