मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सध्या शासन आपल्या दारी कार्यक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यांत घेतला जात आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून विरोधक सातत्याने राज्य सरकारवर टिका करीत आहेत. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”
१३ एप्रिल रोजी शिंदे-फडणवीस सरकारकडून एक शासन निर्णय काढण्यात आला होता. ज्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व जाहिरातीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन निधीतून एक कोटी रुपयांचा खर्च करण्याचे सरकारने ठरवले होते. त्यानंतर 18 ऑगस्टला ट्रीपल इंजिन सरकारकडून एक सुधारित शासन निर्णय काढण्यात आला, ज्यानुसार शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी २ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाची परवानगी देत एकूण खर्च मर्यादा ३ कोटींची करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन निधीतून ३ कोटी रुपये काढून ट्रीपल इंजिन सरकारने तो स्वतःच्या जाहिरातबाजी आणि प्रसिद्धीसाठी खर्च केला. ज्या निधीचा वापर जिल्ह्याच्या विकासासाठी व्हायला पाहिजे होता तो निधी ट्रिपल इंजिन सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उडवला. असा आरोप वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर केला आहे.
हेही वाचा…“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, खरंतर, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मागील अनेक वर्षांपासून पंचायत समिती, सर्कल स्तरावर लाभार्थ्यांना देण्यात येतो. त्यासाठी लाभार्थ्यांना कधीच जिल्हा मुख्यालयी येण्याची गरज पडली नाही. परंतु “आम्हीच जनतेचे कैवारी” हा सोंग घेण्यासाठी या सरकारने शासन आपल्या दारी च्या नावाखाली बनवाबनवी केली. शासनाच्या अनेक अश्या योजना आहे ज्याचा लाभ निराधार, वृध्द आणि दिव्यांग व्यक्तींना देण्यात येतो. या सरकारने प्रसिद्धीसाठी यांच्या जीवाचे हाल केले. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना जिल्हा मुख्यालयी बोलाविले , गर्दी जमत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर येत नाही . निराधार, म्हातारे, दिव्यांग व्यक्तींना ५-५ तास ताटकळत ठेवणे किती योग्य आहे ? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा