मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप विरोधकांच्या इंडिया आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील बैठक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या महायुतीचीही मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया च्या बैठकीला शह देण्याकरिताच भाजपने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा…“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील इंडियाची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल होणार आहेत. तर जगभरातून ३६ पत्रकार देखील या बैठकीसाठी मुंबईत येणार असून सर्व नेत्यांचं जंगी स्वागत महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे. तसेच डिनरसाठी महाराष्ट्रीय संस्कृतीचा देखील याठिकाणी देखावा दिसणार आहे.
हेही वाचा…“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा
दरम्यान, राज्यात अजित पवारांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. भाजपसह, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सुतोवाच मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी देखील एकत्रित निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बीड झालं, आता कोल्हापुरातही अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा होणार”
हेही वाचा…“जनतेला बनवलं भिकारी आणि म्हणे शासन आपल्या दारी”
हेही वाचा…“शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भक्कम घौडदौड सुरू, गुंतवणूकीत महाराष्ट्र नंबर १”
हेही वाचा…“भुजबळांनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ गद्दारी पचवण्याची केविलवाणी धडपड”
हेही वाचा…“मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’