मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षातील कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्याच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी व्यक्त केले. ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासादरम्यान ते ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
“मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर त्या पक्षातील नेत्यांचा कब्जा आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्याचा पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. अन्य पक्षातील नेते कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीत. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. नंदूरबारच्या कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आजच भाजपामध्ये प्रवेश केला. २०२४ ची आगामी निवडणूक येईपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील. असंही त्यांनी सांगितले.
“नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं
भाजपा आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबाची शिवसेना पक्षासोबत युती करून लढवेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, त्याच्या सरकारचे काम, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचे काम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही यश मिळवू. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
“सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?
दरम्यान, ते पुढे बोलाताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा व विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागावर आम्ही यशस्वी होऊ. आमच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजय मिळवू. महाविकास आघाडी ही वैचारिक आधारावर नव्हे तर केवळ भाजपाला दूर ठेऊन सत्ता मिळविण्यासाठी निर्माण झाली. पण विचार सोडल्यामुळे आता पारंपरिक मतदार दुरावण्याच्या भितीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शिवसेनेवर टीका करत आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Read also
- गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा.! “तब्ब्येत ठिक नसूनही शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित, अन् त्याचवेळी अजित पवार गायब”
- “तुमच्यातील योद्धा उद्या…;” हाताला पट्टी बांधून शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात
- “खैरेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे”; शिवसेना अन् काॅंग्रेसमध्ये वाद सुरू
- “सभा घेण्यासाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात”; शिंदे गटाच्या आमदारांचा सवाल
- “संभाजी भिडेंनाही आपल्या सारखं व्यक्तिस्वातंत्र्य”; टिकली प्रकरणावर कडूंची प्रतिक्रिया